Sarkarnama Banner - 2021-04-28T124050.441.jpg
Sarkarnama Banner - 2021-04-28T124050.441.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले.. ''तुमच्या बेजबाबदारपणामुळे १३५ शिक्षकांचा मृत्यू...''

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पंचायत समितीच्या  निवडणुकीत १३५ शिक्षकांच्या मृत्यू झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयाने Allahabad High Court उत्तरप्रदेश सरकारला Uttar Pradesh Govt जाब विचारला आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.  

पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडणूक आयोग, पोलिस दोघांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. 'निवडणूक आयोगाचे न्यायालयात हजर राहून याचा जाब द्यावा,'  असे उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे.  पुढील निवडणुकीत असा प्रकार झाला तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात नुकत्याच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यात निवडणुक प्रक्रियेत सहभागी असलेल्या १३५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार हतबल झाले आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीत सरकार सक्रिय झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या शिक्षकांचा मृत्यू झाला. तुमच्या बेजबाबदारपणामुळे लोकांचा असा मृत्यू झाला तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. 

''राज्यात मी म्हणेन तसेच चालेल. अन्यथा कोणाचेही काहीही चालणार नाही, या भूमिकेतून सरकारने आता बाहेर पडावे, दुसऱ्याच्या विचाराला महत्व द्या, '' असे न्यायालयाने म्हटलं आहे.  ऑक्सीजन, बेडची कमतरता, रेमडेसिविरचा तुटवठा, त्याचा काळाबाजार याबाबत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT